22 डिसेंबर 2012 रोजी, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जाईल. . अशा प्रकारे दरवर्षी 22 डिसेंबर 2012 पासून देशभरात राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जात आहे.
जागतिक आदिवासी दिन || Jagtik Aadiwasi Din .
- Get link
- Other Apps
9 ऑगस्ट
जागतिक आदिवासी दिवस
पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.
- Get link
- Other Apps
Popular posts from this blog
IAS Officer होण्याच स्वप्न बघताय||आयएएस अधिकारी कसे व्हावे || How to Become a IAS Officer.
16 ऑगस्ट IAS Officer आयएएस अधिकारी कसे व्हावे 'मोठं होऊन काय होणार?' हा प्रश्न बहुतांश लहान मुलांना विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक लहान मुलं डॉक्टर (Doctor) , इंजिनिअर (Engineer) अशी उत्तरं देतात मात्र काही मुलं मला IAS व्हायचंय असं उत्तर देतात. खरं म्हणजे IAS होणं सोपं आहे असं आपल्याला लहानपणी जरी वाटत असलं तरी ते अजिबात सोपं नाही हे आता लक्षात येतं. मात्र अशक्यही नाही. आपल्यात जर खरंच जिद्द असेल आपण IAS होऊ शकतो. ही देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे. IAS अधिकारी एक प्रभावी व्यक्ती असतो. हा अधिकारी सर्व विभागांना मार्गदर्शन करतो की कोणत्या विभागात कसं काम करावं. केंद्र सरकारचे सर्व सचिव आयएएस अधिकारी आहेत. केवळ एक IAS अधिकारी सर्व विभागांमध्ये सरकारी धोरणे लागू करतो. राष्ट्रपती आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी असेही म्हटलं जातं. राज्य सरकार IAS अधिकाऱ्याला निलंबित करू शकते पण त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो. IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्
स्वातंत्र्य दिन || Independence Day
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते.. अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.
Comments
Post a Comment